ऊस दरप्रश्नी भारतीय किसान युनीयनची निदर्शने

कांठ : सरकारने सलग चौथ्या वर्षी ऊस दरात वाढ न केल्याबद्दल भारतीय किसान युनीयनने तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी तातडीने ऊस दरवाढ करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

कांठचे तालुका अध्यक्ष जितेंद्र ऊर्फ जितू बिष्णोई म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून ऊस दरात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही. मात्र शेतीसाठी लागणारी सामग्री, खते, कीडनाशके, डिझेल, कामगारांची मजूरी यात प्रचंड वाढ झाली आहे. शेतकरी आता सरकारचे धोरण ओळखू लागले आहेत. सरकारला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे.

ज्येष्ठ नेते ऋषिपाल सिंह म्हणाले, सध्याच्या सरकारमधील लोक जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ते उसाचा दर ४५० रुपये क्विंटल करा अशी मागणी करत होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांनी एक रुपयाही दर वाढवले नाहीत.
यावेळी प्रदेश महासचिव विजेंद्र सिंह यादव, नवनीत विष्णोई, मनोज चौधरी, कपिल खाटियान, हाजी इमरान, महेश ठाकूर, संजीव यादव, सतीश यादव, सरपाल सिंह, शमीम अहमद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here