El Nino च्या पुर्वानुमानानंतरही भारत साखर निर्यात करण्यास सक्षम

नवी दिल्‍ली : साखर उद्योगाशी संबंधीत सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील हंगामात भारतातील साखरेचे उत्पादन स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे असेल आणि अल नीनोच्या (El Nino) पुर्वानुमानानंतरही देश काही प्रमाणात साखर निर्यात करण्यास सक्षम राहील. अल निनोचा परिणाम नेहमीच भारतात कमी पावसासाठी कारणीभूत ठरतो. आणि अल निनोमुळे ऊस उत्पादनावर परिणाम आणि साखर उत्पादनाच्या घसरणीबाबत चिंतेची स्थिती दर्शवत आहे.

दरम्यान, अन्न आणि ग्राहक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव सुबोध कुमार सिंह यांनी याबाबतची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सिंह यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आयएमडी (भारतीय हवामानशास्त्र विभाग) ने सामान्य मान्सूनचे भविष्य वर्तवले आहे. त्यामुळे साखर उत्पादन सामान्य स्तरावर पाहिल. ते म्हणाले की, जर उत्पादनावर परिणाम झाला तर त्याचा परिणाम एवढा मोठा नसेल. आणि साखरेचे कमी उत्पादन होईल अशी शक्यता नाही.

ब्राझीलनंतर भारत जगातील द्वितीय क्रमांकाचा साखर उत्पादक आहे आणि भारताकडून निर्यातीची शक्यता जागतिक साखर पुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमती सद्यस्थितीत ११ वर्षांच्या उच्चांकावर आहेत. सिंह यांनी जैव इंधन आणि जैव ऊर्जा परिषदेदरम्यान, इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितले की, आमच्याकडे जे मान्सून पुर्वानुमान आहे, त्यानुसार पुढील वर्षी साखरेची काही गुणवत्तापूर्ण निर्यात करणे शक्य होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here