मुंडेरवा साखर कारखाना इथली ओळख बनू पाहात आहे: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

बस्ती : शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित एका सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, एक काळ असा होता, जेव्हा मुंडेरवामध्ये आधीच्या सरकारने शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या होत्या. मात्र, आमच्या सरकारने येथे साखर कारखाना स्थापन केला. आज हा साखर कारखाना या परिसराची ओळख बनू पाहात आहे. या कारखान्यामुळे शेकडो लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असून हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ते म्हणाले, आधीच्या सरकारांनी जात, धर्माच्या आधारावर लोकांची विभागणी केली आणि समाजात फूट पाडली. मात्र, आज डबल इंजिन सरकारमुळे आश्चर्यकारक गतीने विकास सुरू आहे. बस्तीमध्ये आज महर्षी वशिष्ठ यांच्या नावावर आपले मेडिकल कॉलेज आहे, जे सहा वर्षापूर्वी अविश्वसनीय होते. याशिवाय, लोकांना घरे आणि शौचालये दिली जात आहेत. युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाशी जोडण्यात आले आहे. आणि आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ५० कोटी रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचे कवच देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here