नारायणगड साखर कारखान्याकडून २७.५९ कोटींच्या ऊस बिलांचे वाटप

ऊस उत्पादक शेतकरी आणि स्थानिक प्रशासनाला दिलासा देताना नारायणगड साखर कारखान्याने गेल्या हंगामातील ऊस बिले अदा केली आहेत.

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, कारखान्याने एप्रिल महिन्यात समाप्त झालेल्या हंगामात २७.५९ कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी दिली नाही तर ३ जानेवारीपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

Tribuneindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, नारायणगड सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट नीरज हे साखर कारखान्याच्या मउख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कार्यभार सांभाळत आहेत. ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांना २७.५९ कोटी रुपयांची ऊस बिले अदा करण्याचे आश्वासन दिले होते. ३१ डिसेंबरपर्यंत ही बिले देण्यास मुदत होतील. त्यास मंजुरी मिळाली आहे. ३० डिसेंबरपासून आम्ही चालू हंगामातील बिले देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय कारखान्याने १२.६० कोटी रुपयांचे पोस्ट डेटेड चेक क्लिअर केले आहेत. शेतकऱ्यांना त्यांची बिले वेळेवर मिळावीत यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत.

भारतीय किसान युनियनचे (चारुनी) प्रवक्ते राजीव शर्मा यांनी सांगितले की, साखर कारखानदारांनी गेल्या हंगामातील बिले देण्यास मंजुरी दिली आहे ही खूप चांगली बाब आहे. चालू हंगामातील ऊस बिलेही दिली जावीत अशी आमची अपेक्षा आहे. वेळेवर पैसे मिळावेत अशी गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here