जिल्हा ऊस अधिकार्‍यांनी घेतला सर्वेक्षणाचा आढावा

बिजनौर ः जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी उसाच्या सर्वेक्षणाची पाहणी करुन आढावा घेतला. सर्व्हेदरम्यान, शेतकर्‍यांना शेतामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हा ऊस अधिकार्‍यांनी बरकातपूर साखर कारखान्याच्या क्षेत्रातील स्वाहेडी गावात सर्व्हेची पाहणी केली. सध्या केवळ उसाच्या लावणीचे सर्वेक्षण केलेजात आहे. गेल्या गळीत हंगामात शेतकर्‍यांनी कारखान्यांना ऊस पाठवला जात होता. त्याच्या खोडव्याची नोंद घेतली गेली आहे. सर्व्हेदरम्यान शेतकरी शेतांमध्ये उपस्थित राहीले पाहिजेत. जर उसाच्या जातीबाबत काही अडचणी आल्या तर त्याचे निराकरण केले पाहिजे. त्यामुळे नंतर गळीत हंगामात काही अडचण येणार नाही असे त्यांनी सांगितले. जर ऊसावर लाल सड रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास कृषी विभाग अथवा कारखान्याला कळविण्याचे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here