थकबाकी न भागवल्याने डीएम नी फटकारले

बिजनौर : साखर कारखान्यांना दिलेल्या आठवड्याच्या 76 करोड थकबाकीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ 28.49 करोड इतकेच पैसे भागवले आहेत. डीएम रमाकांत पांड्ये यांनी थकबाकी न भागवणार्‍या साखर कारखान्यांना कडक शब्दात फटकारले.

धामपूर साखर कारखान्याने 20 करोडच्या तुलनेत 7.40 करोड, स्योहारा ने दहा करोडच्या तुलनेत 3.24, बिलाई ने 12 च्या तुलनेत 9, बरकातपूर ने दहाच्या तुलनेत 2.16 करोड, चांदपूर साखर कारखान्याने सात च्या तुलनेत 3.4 करोड तसेच बिजनौर साखर कारखान्याने पाच करोडच्या तुलनेत 2.21 करोड रुपये भागवले आहेत. बहादरपूर, बुंदकी आणि नजीबाबाद साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची एक पै देखील भागवलेली नाही. डीएम यांनी सांगितले की, ऊस थकबाकी भागवण्यामध्ये कोणतीही कसूर सहन केली जाणार नाही. थकबाकी न भागवणार्‍या कारखान्याच्या अधिक़ार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. दरम्यान जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह व साखर कारखान्यांचे अधिकारी उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here