साखर वाहतुकीच्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करू नका: जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर, ता. 30 : साखर, धान्य, गॅस, दुधासह इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करत असताना आपल्या वाहनांमधून अवैद्य रित्या प्रवाशांची वाहतूक करु नका, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.

कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी आहे. यामुळे पुणे मुंबई येथील अनेक लोक लोकप्रतिनिधींची पत्र घेऊन जिल्ह्यात येत आहे. याशिवाय साखर, दूध, धान्य, गॅसइतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात लोक कोल्हापूर मध्ये येत आहेत. अशा वेळेला पुणे-मुंबई येथील एखादा कोरोना लागण झालेला व्यक्ती ही आपल्या वाहनांमधून प्रवास करू शकतो याचा विचार करून आपण जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करतो याचे भान ठेवून चालक व क्लिनर असे दोघेच या वाहनातून प्रवास करतील, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची वाहने जप्त केली जात आहेत, असाही इशारा श्री देसाई यांनी दिला

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here