पंजाब मध्ये ऊस थकबाकीवरून राजकीय वातावरण तापले

चंडीगढ़ : कांग्रेस सांसद प्रताप सिंह बाजवा यांच्याकडून ऊस शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या मुदयावरुन मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना पत्र लिहिल्यानंतर एका दिवसानंतर पंजाब चे मंत्री ब्रह्म मोहिंदरा यांनी बुधवारी त्यांना सांगितले की, मुख्यमंत्री यांना पत्र लिहिल्यानंतर ‘‘मीडिया मध्ये जाऊ नका’’

मोहिंदरा यांनी सांगितले की, कांग्रेस चे वफादार असणारे बाजवा यांना जनहिताचे मुद्दे समोर आणण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण प्रत्येक गोष्ट करण्याची नेहमीच एक योग्य पध्दत असते.

बाजवा यांनी मंगळवारी पंजाब मध्ये आपल्या पक्षाच्या सरकार वर आरोप केला होता की, ऊस शेतकऱ्यांचे 681.48 करोड़ रुपये भागवण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत.

पंजाब चे स्थानिक निकाय आणि संसदीय मंत्री ब्रह्म मोहिंदरा यांनी बुधवारी सांगितले की, मुख्यमंत्री यांना लिहिलेले पत्र केवळ मुख्यमंत्र्यांना च नाही तर मीडियालाही संबोधित आहे.

मोहिंदरा यांनी सांगितले की, ‘ तुम्ही मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्राला मिडिया मध्ये नेऊ नका कारण यामुळे वास्तविक उद्देश्य पूर्ण होत नाही.’’

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here