कोविड 19 दरम्यान 46 टक्के भारतीयांनी आपला घरखर्च चालवण्यासाठी घेतला उधारीचा आधार

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या दरम्यान जवळपास अर्ध्या भारतीयांनी आपला घरखर्च चालवण्यासाठी कर्जाच्या रकमेवर निर्भर आहेत. एका अहवालात ही माहिती मिळाली आहे. होम क्रेडिट इंडिया ने एका अहवालात सांगितले आहे की, कोरोना दरम्यान इंडस्ट्रिज मध्ये नोकर्‍या जाणे आणि पगारामध्ये कपातीमुळे निम्न आणि मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे आणि लोक लोन आणि उधार घेण्यासाठी मजबूर होत आहेत.

या सर्वेनुसार, 46 टक्के उत्तरदाता आपला घरखर्च चालवण्यासाटी कर्जाच्या रकमेवर निर्भर आहेत. हा सर्वे कोरोना संक्रमणाच्या फैलावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान लोकांच्या उधारीच्या पॅटर्नला समजून घेण्यासाठी सात शहरांच्या 1,000 उत्तरदात्यांमध्ये करण्यात आला होता.

सर्वे रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की, वेतन कपात आणि वेतन देण्यात विलंब हे याचे सर्वात मोठे कारण होते, ज्यामुळे अधिकांश लोकांनी कर्जाकडे कल केला. 27 टक्के उत्तरदात्यांनी उधार घेेण्याच्या मागे आपल्या जुन्या लोनच्या मासिक हप्त्यांच्या पुनर्भुगतान चे दुसरे मोठे कारण सांगितले. अहवालात सांगितले आहे की, 14 टक्के उत्तरदात्यांनी यासाठी उधार घेतले, कारण त्यांची नोकरी कोरोना महामारीच्या दरम्यान गेली होंती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here