आठ साखर कारखान्यांच्या ऊस खरेदीची विक्रमी नोंद

मुझफ्फरनगर: मुझफ्फरनगर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून 900 लाख क्विंटलपेक्षा जास्त ऊसाची विक्रमी खरेदी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी म्हणाले की, या हंगामात जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी 5 मेपर्यंत एकूण 932.11 लाख क्विंटल ऊस शेतकऱ्यांकडून खरेदी केला.

या कारखान्यांमध्ये खतोली, मन्सूरपूर, तिकोला, मोरणा, खैखेडी, टिटवी, रोहणा आणि बुढाणा भागातील साखर कारखान्यांचा समावेश असल्याचे द्विवेदी यांनी नमूद केले.

या साखर कारखान्यांनी आधीच ऊस गाळप करण्यास सुरवात केली आहे आणि शेतातील संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने बंद होणार नाहीत, असे द्विवेदी यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्य शासनाने साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या सुलभतेसाठी लॉकडाऊन दरम्यान ऊस गाळपाची परवानगी दिली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here