नव्या पद्धतीने ऊस उत्पादन वाढीवर जोर

मुरादाबाद : बिलारी नगरच्या राजा का सहसपूर येथील श्री लक्ष्मी शुगर मिवमग्ये शेतकऱ्यांसाठी मेळावा झाला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेंद्र सिंह यांनी ऊस विभागाच्या स्टॉल्सची पाहणी केली. उसासोबत पूरक पिक घेण्यासह नवी तंत्रज्ञानाने उसाचे उत्पादन वाढविण्याबाबत दोर देण्यात आला.

बिलारीच्या साखर कारखान्यात जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी शतेकऱ्यांना सांगितले की, उसासोबत इतर पिके घेतली तर ती शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक ठरतील. त्यासाठी साखर कारखान्यांकडून मदत केली जाईल. शंभर टक्के ऊस बिले देण्यासह साखर कारखान्यांचे व्यवस्थापन, अडचणीविना ऊस पुरवठा यासाठी ऊस विभागाचे काम उत्कृष्ट आहे.
ऊस उत्पादक शेतकरी संस्थेचे सहायक संचालक मनोज श्रीवास्तव यांनी सांगितले की, हवामान बदल, तापमान वाढीमुळे भुगर्भातील जलस्तर कमी होत आहे. त्यामुळे ऊस शेतीवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. कृषी विज्ञान केंद्रातील वैज्ञानिक डॉ. मोहन सिंह यांनी याबाबत उद्बोधक माहिती दिली. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय सिंह यांनी ईआरपी व्यवस्थेबाबत सांगितले. जिल्ह्यात ११ अब्ज मूल्याच्या ऊसाचे शंभर टक्के बिल अदा करण्यात आले आहे. साखर कारखान्यांनी ३५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे त्यांनी सांगितले. कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष चौहान यांनी आगामी हंगामात कारखान्याच्या गेटवर आणि ऊस खरेदी केंद्रावरील व्यवस्थेबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. ऊस उपायुक्त अमर सिंह यांनी ऊस तोडणीनंतर पाला जाळू नये, बँक खात्याचा अचूक क्रमांक नोंदवावा असे सांगितले. उप जिल्हाधिकारी अनुराज जैन यांनी कारखान्याच्या व्यवस्थेचे कौतुक केले. यावेळी ऊस विभागाचे महाव्यवस्थापक प्रविण सिंह यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here