साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची समाप्ती

मुझफ्फरनगर : धामपूर येथील मन्सुरपूर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची शुक्रवारी समाप्ती झाली. चालू हंगामात साखर कारखान्याकडून एक कोटी ४४ लाख ५१ हजार क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार दीक्षित यांनी गाळप हंगाम यशस्वी केल्याबद्दल जिल्हा प्रशासन, शेतकरी तसेच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

कारखान्याचे केन विभागाचे सर व्यवस्थापक बलधारी सिंह, कारखाना व्यवस्थापक रविंद्र कुमार शर्मा, इंजिनीअरिंग विभागाचे सर व्यवस्थापक दीपक कुमार, डीजीएम प्रॉडक्शन पवन शर्मा, ऊस व्यवस्थापक प्रदीप कुमार राठी, संजीव शर्मा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here