पुढील काही वर्षात भारतात इथेनॉलचा खप वाढणार: Fitch Solutions

सिंगापूर : पुढील काही वर्षात भारतामध्ये इथेनॉलच्या खपात वाढ होणार आहे, असा अहवाल फिच सोल्यूशन्सने (Fitch Solutions) जारी केला आहे. सरकारने इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देऊन साखर उद्योगाला पाठबळ देण्याचे धोरण स्वीकारल्याने हे शक्य होत असल्याचे फिचने म्हटले आहे.

यासोबतच कोविड १९मुळे घातले गेलेले निर्बंध हटवून दळणवळण क्षेत्रातील सुधारणांसह पेट्रोल-डिझेलसोबतच इथेनॉलची मागणी वाढण्याची शक्यता आहे. आगामी वर्षांमध्ये देशांतर्गत रसायन आणि आरोग्य सेवा क्षेत्रांमधील विस्तारासह औद्योगिक इथेनॉलची मागणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी दुसऱ्यांना सरकारने ई २० हे उद्दिष्ट पुढे आणले आहे. त्यामुळे सरकार या बाबतीत किती गांभीर्याने विचार करीत आहे हे समोर आले आहे.

जर २०२५ मध्ये ई २० हे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी एकूण ९ बिलियन लिटर इथेनॉलचे उत्पादन गरजेचे आहे. मोटार इंधनासाठी ७.५ बिलियन आणि औद्योगिक वापरासाठी १.५ बिलियन इथेनॉलचे उत्पादन आवश्यक असेल. सध्याच्या देशांतर्गत ६.३ बिलियन लिटर इथेनॉल उत्पादनापेक्षा ही मागणी अधिक आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here