तीन साखर कारखाने बनवणार उसाच्या रसापासून इथेनॉल

बरेली, उत्तर प्रदेश: जिल्ह्यातील तीन साखर कारखाने आता उसाच्या रसापासून थेट इथेनॉलचे उत्पादन करणार आहेत. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर फरीदपूर, मिरगंज आणि नवाबगंज साखर कारखान्यात प्लांट स्थापन केला जात आहे. पुढील गळीत हंगामापासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन सुरू झाल्यानंतर आगामी कालात साखर कारखाने गरजेनुरुप साखरेचे उत्पादन करतील. इतर वेळी रसापासून थेट इथेनॉल तयार करतील. त्यातून साखर कारखान्यांचा फायदा अधिक वाढेल आणि ते शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देऊ शकतात. सध्या कारखाने साखरेच्या उत्पादनानंतर उर्वरित घटकांपासून इथेनॉल तयार करतात. नव्या प्लांटमध्ये थेट उसापासून इथेनॉल उत्पादन होईल. इथेनॉलचे उत्पादन वाढल्याचा फायदा कारखान्यांसह शेतकऱ्यांनाही मिळेल.

जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर साखरेच्या मागणीत घट आली आहे. कारखान्यांकडे निम्मा स्टॉक अद्याप शिल्लक आहे. दोन-तीन महिन्यानंतर गळीत हंगाम सुरू होईल. साखरेच्या मागणीत घट आल्याने कारखाने शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाहीत. आता इथेनॉलची बाजारातील मागणी वाढत असून पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाणही वाढवले जाणार आहे. त्यामुळे फायदा होईल. दरम्यान, फरीदपूर कारखान्यात प्लांट स्थापन केल्यानंतर थेट उसापासून इथेनॉल उत्पादन करणारी तो उत्तर भारतातील पहिला साखर कारखाना ठरेल. सध्या पेट्रोलचे दर उच्चांकी स्तरावर आहेत. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रण केले जात होते. आता त्याची मर्यादा २० टक्क्यांवर आणली गेली आहे. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल स्वस्त आहे. त्यामुळे पेट्रोलचे दरही कमी होतील अशी अपेक्षा आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here