केंद्र सरकारकडून 2020-21 साठी इथेनॉल खरेदी दरात वाढीची शक्यता

नवी दिल्ली: कारखाने अतिरिक्त साखर साठ्याशी झुंज देत आहे आणि ज्यामुळे कारखान्यांना आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच उसाची थकबाकी भागवणेही कठीण झाले आहे. आता सरकार यामुळे कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी लक्ष केंद्रित करण्यावर जोर देत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अतिरिक्त साखरेच्या समस्येशी निपटण्यासाठी आणि इथेनॉल उत्पादनाला वाढवण्यासाठी साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्र सरकार 2020-21 हंगामासाठी अडीच ते तीन रुपये प्रति लीटर दरम्यान इथेनॉलच्या सर्व तीन श्रेणींचे खरेदी मूल्य वाढवू शकते. आर्थिक बाबींच्या मंत्रीमंडळाची समिती (सीसीईए) लवकरच यावर निर्णय घेण्याची आशा आहे.

देशामध्ये 2022 पर्यंत पेट्रोल बरोबर 10 टक्के इथेनॉल संमिश्रण च्या लक्ष्याला प्राप्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. केंद्र सरकारही साखरेच्या ऐवजी इथेनॉल उत्पादन करणार्‍या कारखान्यांना प्रोत्साहन देत आहे, जे कारखान्यांना साखरेच्या उत्पादनामुळे होणार्‍या नुकसानीवर नियंत्रण मिळवण्यात मदत करेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here