दीड महिन्यानंतरही थकीत ऊस बिलांमुळे शेतकरी संतप्त

डोईवाला: उत्तराखंड सरकार आणि साखर कारखान्याच्या प्रशासनाविरोधात परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. डोईवाला साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटून गेल्यावरही पैसे न दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लवकर ऊस बिले न दिल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शुक्रवारी येथील शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ऊस उत्पादक ईश्वरचंद, सहकारी ऊस विकास समितीचे अध्यक्ष मनोज नौटियाल, पवन लोधी, जसवंत सिंह, इंद्रजित सिंह, लोकेश कुमार, ओमप्रकाश कांबोज, उमेद बोहरा, सुबोध नारायण शर्मा यांनी सांगितले की, डोईवाला साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला आहे. कारखान्याने ९ लाख ५० हजार क्विंटल ऊसाचे गाळप केले. जवळपास ८५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना आतापर्यंत बिले दिलेली नाहीत. ऊसाचा दरही जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना जर लवकर पैसे मिळाले नाहीत, तर आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.

दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक मनमोहन सिंह रावत यांनी सांगितले की, कारखान्याला सरकारकडून बँक गॅरंटी मिळाली आहे. डोईवाला साखर कारखान्याला उत्तराखंड को-ऑपरेटिव्ह आणि जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने ६७ कोटी रुपयांचे वितरण केले जात आहे. २५ जानेवारीपासून शेतकऱ्यांना पैसे देण्यास सुरू केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here