कालाखेडा साखर कारखान्याकडे जादा ऊस उपलब्ध

हसनपूर : कालाखेडा येथील किसान सहकारी साखर कारखान्याकडे भरपूर उसाचा पुरवठा होत आहे. याशिवाय शेतांमध्येही मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत शेतातील ऊस संपत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू ठेवण्याची मागणी भारतीय किसान संघाने केली आहे.

वेळेवर तोडणी चिठ्ठी मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. जर वेळेवर तोडणीच्या चिठ्ठ्या दिल्या असत्या, तर उसाचे गाळप वेळेवर झाले असते. आता कडक उन्हाळ्यात ऊस तोडण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय शेतकरी गव्हाचे पिक कापण्यात गुंतले आहेत. कारखाना आणखी किमान १० दिवस सुरू राहू शकतो असे सांगितले जात आहे.

जोवर कारखान्याची गाळप क्षमता वाढवली जात नाही, तोपर्यंत समस्या संपणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतांमध्ये जोवर ऊस उभा आहे, तोपर्यंत कारखान्याचे गाळप बंद करू नये अशी मागणी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष कृष्ण कुमार शर्मा यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा किसान संघाने दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here