उसाच्या पीकासाठी अत्याधिक पाण्याचा वापर संकट निर्माण करत आहे: पाणी विशेषज्ञ

औरंगाबाद: जल विशेषज्ञ राजेेंद्र सिंह यांनी सांगितले की, उसाच्या शेतीसाठी पाण्याचा अत्याधिक वापर महाराष्ट्राला संकटाकडे घेेवून जात आहे. त्यांनी गुरुवारी, जलवायु परिवर्तन आणि जल व्यवस्थापन या विषयावरील एका वेबिनार दरम्यान हे सांगितले. हा वेबिनार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विश्‍वविद्यालयाच्या बाळासाहेब पवार अध्ययन केंद्राकडून आयोजित करण्यात आला होता.

त्यांनी सांगितले की, एक वेळ महाराष्ट्र आपल्या मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेंतीसाठी ओळखला जात होता. पण गेल्या काही वर्षांमद्ये, उसाच्या शेतीसाठी पाण्याच्या अत्यधिक वापरामुळे राज्यामध्ये पर्यावरण असंतुलन निर्माण झाले आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्राला यामुळे जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. सिंह, ज्यांना भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जाते, त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, पण याच्या उपयोगाबाबत योजना अनुचित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here