अजबापूर साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेचा विस्तार

चपरतला/पसगवां-खीरी : अजबापूर साखर कारखान्याने गाळप क्षमतेत वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या गाळप हंगामात कारखान्याची गाळप क्षमता १०,५०० टीसीडीवर कार्यान्वित आहे. विस्तारीकरणानंतर ही क्षमता १३,५०० टीसीडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मशिनरीची ऑर्डरही देण्यात आली आहे.

गाळप क्षमता वाढल्याने आगामी गळीत हंगामात २०२२-२३ मध्ये कारखाना जवळपास ६० लाख क्विंटलहून अधिक उसाचे गाळप करू शकेल. कारखान्याचे युनिट प्रमुख पंकज सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आगामी सत्रात सर्व शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केली जाणार आहे. कोणत्याही शेतकऱ्याने आपली तोडणी पावती वाया घालवू नये. सर्व पावत्यांना यावर्षीच्या बेसिक कोट्यानुसार आगामी गळीत हंगामात वाढ दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्याला साफ उसाचा पुरवठा करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here