कृषी प्रक्रिया खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत ४४.३ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली: कोरोना महामारीची दुसरी लाट असतानाही सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे चालू आर्तिक वर्षाच्या पहिली तिमाहीत कृषी तथा प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांच्या निर्यातीमध्ये ४४.३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्यावर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

वाणिज्य तथा उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कृषी आणि पूरक प्रक्रिया खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीडा) अथक प्रयत्नांमुळे आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातील कृषी तथा प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांची निर्यात ४४.३ टक्के इतकी वाढल्याची नोंद झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात ४ अब्ज ८१ कोटी ७९ लाख डॉलर मुल्याची उत्पादने एपीडाने निर्यात केली. समान कालावधीत २०२०-२१ मध्ये हा आकडा ३ अब्ज ३३ कोटी ८५ लाख डॉलर होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here