पाऊस-पुरामुळे विदारक स्थिती, बंगालमध्ये ३ लाख लोकांना फटका, मध्य प्रदेशात २३ जिल्ह्यांत अ‍ॅलर्ट

देशाच्या विविध भागात पाऊस आणि पुरामुळे स्थिती प्रचंड बिघडली आहे. डोंगरी भागात पावसासह भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. तर इतर भागात पाऊस, पुरामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

पश्चिम बंगालच्या अनेक भागात पावसामुळे तीन लाख लोकांना फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे परिस्थिती घातक बनली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे पश्चिम बंगालच्या सात जिल्ह्यातील तीन लाख लोकांना फटका बसला आहे. आतापर्यंत २३ लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यांना पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे चार लाख हेक्टर शेती पाण्याखाली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व आणि पश्चिम वर्धमान, पश्चिम मेदिनीपूर, हुगली, हावडा, साऊथ २४ परगणा, बीरभूम जिल्ह्यांना सध्या फटका बसला आहे. बंगालमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी धरणांतून पाणी सोडले जात आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशात २३ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये इशारा दिला असून ग्वाल्हेर आणि चंबळ क्षेत्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हवाई पाहणी केली असून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्वाल्हेर आणि चंबळमध्ये ३० हजार जणांची सुटका करण्यात आली आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here