नवा गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याची कारखान्यांची तयारी

शामली: जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी नवा गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासाठीच्या देखभाल, दुरुस्तीची कामे सुरू आहेत. उसाच्या सर्व्हेनंतर नव्या सदस्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे.
शासनाने कारखाने सुरू करण्यासाठी २० ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी जिल्ह्यातील शामली, ऊन आणि थानाभवन या कारखान्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली आहे. त्यांनी कारखान्यांना गळीत हंगामाविषयीच्या सूचना दिल्या आहेत. शामली ऊस सहकारी समितीचे विशेष सचिव मुकेश राठी यांनी सांगितले की, उसाच्या नोंदणीबाबतची माहिती गाव स्तरावर देण्यात आली आहे. तोडणीच्या वेळापत्रकात सुधारणेनंतर तो डाटा पुढील आठवड्यात अपलोड केला जाईल. ऊस सहकारी समितीने शेतकऱ्यांच्या तोडणी पावत्या तयार करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय नव्या सदस्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. वीस ते ३० सप्टेंबर या कालावधीत सहकारी समित्या मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतील. एक ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करून वेळापत्रक शेतकऱ्यांना दिले जाईल.

दरम्यान, ऊन कारखान्याची गाळप क्षमता नव्या हंगामात ७५ हजार क्विंटल होणार आहे. आता ही क्षमता ७० हजार क्विंटल आहे. कारखान्याचे महाव्यवस्थापक अनिल अहलावत यांनी सांगितले की, १५ सप्टेंबरपर्यंत लखनौ ऊस विभागाचे पथक क्षमता वाढीबाबतची पाहणी करून सरकारला अहवाल सादर करेल. शामली कारखान्याची गाळप क्षमता ७५ हजार क्विंटल प्रती दिन असून थानाभवन कारखान्याची गाळप क्षमता ९० हजार क्विंटल प्रती दिन आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here