नव्या गाळप हंगामात मजुरांच्या कमीमुळे कारखाने हार्वेस्टर मशीनवर अवलंबून

औरंगाबाद: 2020-2021 उस गाळप हंगाम गुरुवारी सुरु झाला, पण हे दिसून येत आहे की, कोविड महामारीमुळे यावर्षी उसतोड श्रमिकांची संख्या कमी होवू शकते, ज्याचा थेट परिणाम उसतोडीवर होवू शकतो. ज्यामुळे साखर कारखान्यांनी मशीन हार्वेस्टर चा पर्याय निवडला आहे आणि मशीनचा शोध सुरु केला आहे. तसेच श्रमिकांकडून मजुरी वाढवण्याच्या मागणीबाबत संप सुरु आहे, ज्यामुळे गाळप हंगाम प्रभावित होण्याची शक्यता दिसत आहे. मार्चमध्ये लॉकडाउन ची घोषणा झाल्यावर अधिकांश श्रमिक साखर कारखान्यांमध्ये अडकले होते आणि एका महिन्यानंतर ते आपल्या घरी जावू शकले आहेत. आता, त्यापैकी अधिकतर मराठावाड्यामध्ये राहतात, त्यांना पश्‍चिमी महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांकडून यापूर्वीच एडव्हान्स देवून गाळपासाठी तयार करण्यात आले आहे. साखर उद्योगाशी जोडलेल्या लोकांनी महामारीचे कारण सांगून हार्वेस्टर मशीनचा शोध सुरु केला आहे.

गेल्या गाळप हंगामासाठी शेतकर्‍यांना थकबाकी भागवण्यामध्ये कारखाने अपयशी ठरल्याने साखर आयुक्तालयाने या गाळप हंगामासाठी अनेक साखर कारखान्यांचे परवाने थांबवून ठेवले आहे. अनेक साखर कारखाने थकबाकी भागवण्यासाठी र्पैसे जोडण्यासाठी धावपळ करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here