कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे त्वरित द्यावेत: भारतीय किसान युनियन

रामपूर : शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यास साखर कारखाने टाळाटाळ करीत आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांचे दोन अब्ज रुपये थकवले आहेत. हे पैसे त्वरीत मिळण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय किसान युनीनयने शेतकरी पंचायतीमध्ये दिला.

मंगळवारी कार्यालयात झालेल्या शेतकरी पंचायतमध्ये जिल्हाध्यक्ष हसीब अहमद यांनी थकीत उसबिलांचा मुद्दा मांडला. तिन्ही साखर कारखान्यांनी थकीत ठेवलेल्या पैशांचा हिशोब त्यांनी सांगितला. कारखान्यंनी एक अब्ज ९४ कोटी ३३ लाख रुपये थकवले आहेत. यातील करीमपूर कारखान्याकडे सर्वाधिक पैसे आहेत. कारखान्याने १५ डिसेंबरपासून शेतकऱ्यांना एक रुपयाही दिलेला नाही असे यावेळी सांगण्यात आले. बरेली, बदायूँ आणि मुरादाबाद कारखान्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले. तर त्रिवेणी कारखान्याने ३५.२७ कोटी रुपये थकवले आहेत. विलासपूर कारखान्याकडे ३.८८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्रिवेणी कारखान्याने १५ फेब्रुवारी तर विलासपूर कारखान्याने २६ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत असे यावेळी सांगण्यात आहे.

उसाचे पैसे देण्याबद्दल सरकारकडून खोटी वक्तव्ये केली जात असल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले. कारखानदार अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. त्यामुळे आता शेतकरीच कारखान्यांविरोधात आंदोलन करतील. दिल्लीतील शेतकरी आंदोलनही यशस्वी करावे असे आवाहनही यावेळी जिल्हाध्यांनी केले. यावेळी हरिओम रवि, रामबहादुर सागर, सुलेमान, रामगोपाल, होरीलाल, भगत सिंह, विनोद, जगत सिंह, मनजीत सिंह, ओम सिंह, नरसिंह, राजपाल सिंह आदी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here