साखर कारखान्यातील अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू

कर्नाल : कर्नालमध्ये सहकारी साखर कारखान्यात झालेल्या एका अपघातात ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. कर्नाल जिल्ह्यातील लालूपुरा गावातील सुभाष कुमार असे मृताचे नाव आहे.

लालुपुरामधील शेतकरी सुभाष कुमार हे साखर कारखान्यात आपला ऊस घेऊन आले होते. यादरम्यान, त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये काहीतरी बिघाड झाला. त्यामुळे दुसरा ट्रॅक्टर जोडून आपला ट्रॅक्टर ओढण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला होता. जेव्हा त्यांनी दुसरा ट्रॅक्टर जोडून आपला ट्रॅक्टर ओढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुर्दैवाने ते दोन्ही वाहनांच्या मध्यभागी सापडले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here