ऊसाचे वजन न झाल्याने नाराज शेतकऱ्यांनी केले आंदोलन

बघौली (संतकबीरनगर): मुंडेरवा साखर कारखान्याच्या ऊस केंद्र माहनपार बघौली वर ऊसाचे वजन न झाल्याने नाराज शेतकऱ्यांनी शुकवारी क्रय केंद्रावर आंदोलन केले. शेतकऱ्यांनी वेळेवर ऊसाचे वजन न करण्याचा केंद्रावर आरोप केला.

मुंडेरवा साखर कारखान्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस खरेदीसाठी माहनपार बघौली मध्ये क्रय केंद्र सुरु केले आहे. शुक्रवारी अवधेश चौधरी, जगदीश राय, शिवकुमार चौधरी, धीरज चौधरी, शोभनाथ चौधरी, रामू, बलिराम चौधरी, रामनाथ, रामचरन, इंद्रजीत, रामभुज चौधरी या शेतकऱ्यांनी आंदोलन करताना सांगितले की, ऊसाचे वजन 24 तासात होणे गरजेचे आहे, पण एका आठवड्यानंतर ही वजन केले जात नाही. यामुळे ट्रॉली मध्ये ऊस वाळत आहे. ऊसाचे वजन करण्याची गती मंद आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, कारखान्याकडून अनुबंधानुसार ऊसाचे वजन 24 तासात होणे गरजेचे आहे. क्रय केंद्राचे काटा बाबू अनिल सिंह यांनी सांगितले की, प्रतिदीन सरासरी मध्ये सहाशे क्विंटल ऊस खरीदला जात आहे. तर ऊस पुरवठा 12 ते पंधराशे किंवटल आहे, यासाठी वजन होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here