ऊस दर वाढीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

बगहा, बिहार:लक्ष्मीपूर मध्ये रविवारी शेतकर्‍यांनी आगामी ऊस हंगाम 2020-21 साठी 450 रुपये प्रति क्विंटल ऊस दराच्या मागणीसाठी आंदोलन केले.

शेतकरी राजू उपाध्याय, सिपाही यादव, बडा उपाध्याय, बीगा यादव, राज किशोर तिवारी, वीरेंद्र यादव यांच्यासह डझनभर शेतकर्‍यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या दुर्दशेबाबत सरकारला कोणतेही देणे घेणे राहिले नाही. गेल्या तीन वर्षांपासून ऊस दर स्थिर आहेत. ज्यामुळे शेतकर्‍यांना मोठे नुकसान झाले आहे. महागाई वाढतच आहे.

बगहामध्ये एका प्रखंडातील शेतकरी आपल्या एकूण जमिनीच्या 80 टक्के भागामध्ये ऊस लावत आहेत. तर तांदूळ, गहू व इतर पीके मात्र 20 टक्केच लावतात. शेतकर्‍यांच्या सर्व आर्थिक खर्चासाठी एक मात्र नकदी पीक आहे ते म्हणजे ऊस.
शेतकरी नेता राजू उपाध्याय यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना कदाचित आपले अश्‍वासन आठवणीत नसेल. त्यांनी सत्तेत आल्यावर बगहा अनुमंडलीय मैदानामध्ये जनतेला विश्‍वास दिला होता की, आपले सरकार आल्यावर ऊसाचा दर यूपीपेक्षा अधिक देवू. सध्या अशी परिस्थिती आहे की, शेतकर्‍यांची अवस्था खूपच दयनीय आहे. सरकारकडे मागणी केली आहे की, कोरोना मध्ये एक वर्षाचा कर माफ व्हावा. खत आणि औषधांचा दर कमी करावा , तांदूळ आणि ऊसाच्या नुकसानीची भरपाई द्यावी व बगहा एक विभागाला पूरग्रस्त घोषित करावे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here