केशवरायपाटन कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

कोटा : राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील केशवरायपाटन येथील साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोटा येथे धरणे आंदोलनासह उपोषण सत्र सुरू केले आहे.

राज्यातील कोणताही मंत्री, अथवा अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कारखाना तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here