आंध्र प्रदेशात गुळाचा दर वाढल्याने चित्तूरमधील शेतकरी, व्यापारी खुश

चित्तूर : बाजारपेठेत गुळाचा दर वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी वर्ग खुश झाला आहे. त्यामुळे गेले वर्षभर व्यापाऱ्यांनी चांगलाच नफा कमावला आहे. व्यापारी चांगल्या दराने गुळाची देशभर निर्यात करीत आहेत.

चित्तूर जिल्ह्यातून दररोज सुमारे १५० मेट्रिक टन गूळ नेला जात आहे. यापूर्वी काळ्या गुळाची किंमत सरासरी ३० रुपये होती. आता ४० रुपये किलोने गूळ मिळत आहे. अशाच पद्धतीने पिवळ्या गुळाची किंमत सरासरी ४५ रुपयांवरून वाढून ५० रुपये झाली आहे. चित्तूर जिल्ह्यात सुमारे १३,००० हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती केली जाते.

सध्या शेतकरी १.५० लाख टन ते १५००० टन काळ्या आणि पिवळ्या गुळाचे उत्पादन करतात. सरासरी १० टन उसापासून एक टन गूळ तयार करण्यात येतो. जिल्ह्यातील व्यापारी तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये गुळाची विक्री करतात. गंगाधरा नेल्लोर येथील एक शेतकरी सुधीर रेड्डी यांनी सांगितले की, आम्ही तामिळनाडूतील विविध भागात गूळ पाठवतो.

लॉकडाऊनच्या काळात काही अडचणींशी सामना करावा लागला. आता चित्तूर मार्केट यार्डात गूळ ४० रुपये किलो आहे. सालेम, धर्मपुरी आणि चित्तूर जिल्ह्यातील शेतकरी वेल्लोरमध्ये गुळाची विक्री करतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here