ऊस बिले न मिळाल्याने नाराज शेतकऱ्यांची आंदोलनाची तयारी

हापूड : भारतीय किसान युनियनच्या भानू गटाने सिंभावली शुगर मिलच्या गेटवर थकीत ऊस बिलांसह इतर समस्यांबाबत २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. यासाठी गावोगावी प्रचार करण्यासह संघटनेच्या स्तरावर लोकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांबाबत सरकार गंभीर नाही. निवडणुकीच्या वेळी सरकारने चौदा दिवसांत ऊस बिले दिली जातील असे सांगितले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर सरकारला आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे असे भाकियूच्या भानू गटाचे जिल्हाध्यक्ष पवन हुण यांनी सांगितले. तर किसान मजदूर मोर्चाचे सुबिश त्यागी म्हणाले, सरकार आणि यंत्रणा शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याने ही अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना कर्ज काढायला भाग पडले आहे. शेतकऱ्यांना स्वतःचे पैसे मिळत नसल्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

सिंभावली तथा ब्रजनाथपूर साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ३०० कोटीरुपये थकवले आहेत. वारंवार आंदोलन केल्यानंतर किरकोळ रक्कम शेतकऱ्यांच्या हातावर टेकवली जाते असे भाकियूचे अजय त्याची यांनी सांगितले. ऊस बिलांसह विविध प्रश्नांबाबत आंदोलन सुरू केले जात आहे. शेतकऱ्यांचे शोषण केले जात असल्याने संघटित लढा दिला जात असल्याचे जितेंद्र नागर यांनी स्पष्ट केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here