शामली : शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांसह विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन केले. या दरम्यान त्यांनी राष्ट्रपतींच्या नावे चार मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी बृजेश कुमार सिंह यांना दिले. शेतकरी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष सवित मलिक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. तेथे त्यांनी आंदोलन केले.
अमर उजालामधील वृत्तानुसार, उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कोर्टाच्या आदेशानुसार, लवकरात लवकर ऊस बिले तातडीने द्यावीत. ऊस खरेदी केल्यानंतर त्याचा दर ठरवून तो तातडीने बँकेत जमा करण्याची गरज आहे. राज्य सरकारने विज बिलांमध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. हरियाणा राज्याच्या
धोरणानुसार शेतकऱ्यांकडून विज बिले वसुल करावीत. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी. अग्निविरांना कायमस्वरुपी नोकरी दिली गेली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी विनय पवार, नरेंद्र, राजकुमार तोमर, राजपाल सिंह, अंकुर मलिक, जुबेर खान अमित निर्वाल, फैय्याज आदी उपस्थित होते.