साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढीची शेतकऱ्यांची मागणी

बागपत : विविध गावांतील शेतकऱ्यांनी बागपत सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सद्यस्थितीत बागपत सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता अधिक आहे. मात्र, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र अधिक आहे. यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखाना २२ जूनपर्यंत सुरू ठेवावा लागला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर पिके घेता आली नव्हती. शेतकऱ्यांना त्यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी रवि काठा, अमित, देवेंद्र धामा, ओमबीर सिंह, राममेहर सिंह धामा आणि धर्मपाल आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here