व्याजासहित ऊस थकबाकी देण्याची शेतकर्‍याची मागणी

बिजनौर: आजाद किसान यूनियन च्या बैठकीमध्ये ऊस थकबाकी व्याजासहित देण्याची मागणी करण्यात आली. ऊस समितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी सांगितलें की, सरकार शेतकर्‍यांना पीक मूल्याच्या दीड पट मूल्य मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे. शेतकर्‍यांना नाइलाजाने गहूदेखील सरकारी मूल्यापेक्षा कमी किमतीत विकावा लागत आहे. यानंतर यूनियननें मुख्यमंत्री यांच्या नावे मागणीचे निवेदन एडीएम प्रशासन विनोद कुमार गौड यांना दिले. निवेदनामध्ये ऊस दर 450 रुपये प्रति क्विंटल करणे, कॅनॉलच्या शेवटपर्यंत पाणी पोचवणे, झलरा गावाजवळ बंद पडलेला नाला पुन्हा खोलणे, विजेच्या खराब अवस्थेत असणार्‍या लाईन्स बदलणे, 60 वर्षापेक्षा जास्त वय असणार्‍या शेतकर्‍यांना पेन्शन मिळवून देणे, निराधार जनावरांना पकडणे, करार शेती चा अध्यादेश परत घेणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान राष्ट्रीय उपाध्यक्ष विरेंद्र सिंह, जिल्हाध्यक्ष धीरज कुमार, मास्टर गिरीराज सिंह, एमपी सिंह, हुकम सिंह, सुभाष काकरन आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here