ऊस बिले व्याजासह देण्याची शेतकऱ्यांची मागणी

बिजनौर : भारतीय किसान युनियन लोक शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष चौधरी वीर सिंह सहरावत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात पाच मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष चौधरी वीर सिंह सहरावत यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी मागे घेतले जावेत. आणि शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा लागू करावा. शेतकऱ्यांसाठी २४ तास विज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांना ऊसाची सर्व थकबाकी त्वरीत मिळायला हवी. कृषी क्षेत्राबाबतचा स्वामीनाथन अहवाल लागू करण्यासाठी सरकारने त्वरीत प्रयत्न सुरू करावेत.
निवेदन देताना सतवीर सिंह, रामकुमार सिंह, भुपेंद्र सिंह, गजराज सिंह, जोगेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here