होळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळाले २७ कोटी रुपये

रामपूर : होळीच्या सणापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकीपैकी २७ कोटी रुपये आले आहेत. त्यामुळे सणाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. दरम्यान, तीन साखर कारखान्यांकडे अद्याप शेतकऱ्यांचे पावणेदोनशे कोटी रुपयांची थकबाकी आहे.

जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. त्यांच्याकडे सुमारे २ अब्ज कोटी रुपयांची थकबाकी आहे. शाहबाद येथील करीमगंज मधील राणा साखर कारखाना आणि दढियाल परिसरातील मिलक नारायणपूरस्थित त्रिवेणी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकबाकी अधिक आहे.

शेतकऱ्यांनी होळीपूर्वी पैसे मिळावेत अशी मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी रविंद्र कुमार मादंड यांनी २२ मार्च रोजी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानंतर २३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत तिन्ही साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले.

जिल्हा ऊस अधिकारी हेमराज सिंह यांनी सांगितले की, करीमगंजच्या राणा साखर कारखान्याने सुमारे १४ कोटी रुपये, त्रिवेणे साखर कारखान्याने सुमारे ११ कोटी रुपये आणि विलासपूरच्या रुद्रविलास साखर कारखान्याने सुमारे सव्वादोन कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत. मात्र, हे पैसे शेतकऱ्यांना पुरेसे नाहीत. मात्र, होळीपूर्वी थोडे पैसे बँकेत जमा झाल्याने शेतकऱ्यांना थोडाफास दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here