पलियाकला : उत्तर प्रदेश किसान मजदूर मोर्चा संघटनेने १५ जुलै रोजी लखनौमध्ये धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. गेल्या २५ दिवसांपासून शेतकरी साखर कारखान्याच्या परिसरात आंदोलन करीत आहेत. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. प्रशासनानेही आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी ऊस बिलांसाठी शेतकरी आणि साखर कारखाना प्रशासन आमने-सामने येतात. ऊसाचे पैसे त्वरित मिळावेत यासाठी शेतकऱ्यांना धरणे आंदोलन करावे लागते. यावर्षी कोरोनाच्या कालावधीतही शेतकऱ्यांना उसाच्या पैशांची मागणी करत आंदोलन करीत आहेत. पैसे न मिळाल्याने त्यांना कुटुंब चालविण्यास अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय ते कामगारांना पैसे देऊ शकत नाहीत. २२ जून रोजी झालेल्या शेतकऱ्यांच्या महापंचायतीमध्ये पैसे देण्याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत साखर कारखाना पैसे देत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link