चित्तूर जिल्ह्यात शेतकरी ऊस शेतीपासून दूर

चित्तूर : चित्तूर आणि रेनिगुंटा  मध्ये सहकारी साखर कारखाने बंद झाल्यामुळे आणि खाजगी कारखान्यांच्या ऊस थकबाकी देण्यात होणार्‍या विलंबामुळे शेतकरी ऊसाची शेती करण्यापासून दूर जात आहेत. ज्यामुळे येथील ऊस  उत्पादनावर परिणाम होत आहे. जिल्ह्यात पावसाच्या कमीमुळे अडचणीत वाढच होत आहे.

जिल्ह्यामध्ये शेतकरी भुईमुगा च्या लागवडीकडे वळत आहेत. पण यावरही परिणाम होत आहे. चांगल्या पावसाच्या आशेसह, भुईमुगा ची लागवड 15 जूनपासून सुरु होण्याचा अंदाज होता. जिल्ह्यातील पश्‍चिमी मंडलांमध्ये शेतकर्‍यांच्या एका वर्गाने देखील या महिन्याच्या सुरुवातीला लागवडीचे काम सुरु केले होते. चित्तूर जिल्ह्यामध्ये या महिन्यात 85 मिमी कमी पावसाची नोंद केला आहे. पुर्वानुमानानुसार, जिल्ह्यामध्ये पुढच्या एक आठवड्यापासून दहा दिवसांपर्यंत पाऊस  होण्याची कोणतीही शक्यता नाही. ऊसाच्या पीकाला गती देण्यासाठी प्रलंबित थकबाकी भागवणे आणि कारखाने पुनरुर्जिवित करण्याची गरज आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here