पंजाब सरकारविरोधात थकीत ऊस बिलांसह इतर मुद्यांबाबत शेतकरी संघटनेची आंदोलनाची घोषणा

चंदीगढ : थकीत ऊस बिले आणि इतर मुद्द्यांविषयी Samyukt Kisan Morcha ने ३ ऑगस्ट रोजी पंजाबमध्ये आप (AAP) सरकारच्या विरोधात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. राज्यभरातील शेतकरी त्या दिवशी राज्यात माजा, मालवा आणि दोआबा अशा तीन ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रोखणार आगेत. ऊस थकबाकीबाबत शेतकरी संघटनांसोबत १७ एप्रिल आणि १८ मे रोजी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत ऊस बिलांची थकबाकी आणि इतर अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र, आतापर्यंत शंभर टक्के ऊस बिले मिळालेली नाहीत.

राज्य सरकारने १५ सप्टेंबरपर्यंत सहकारी साखर कारखान्यांना तीन हप्त्यात ३०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. थकीत ऊस बिले मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सरकारकडून १०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता ३० जुलैपर्यंत मिळेल. त्यानंतर दुसरा हप्ता ३० ऑगस्ट आणि अंतिम १०० कोटी रुपयांचा हप्ता १५ सप्टेंबरपर्यंत जारी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here