थकीत ऊस बिलांबाबत कर्नाटक सरकारने साखर कारखान्यांना त्वरीत निर्देश देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

धारवाड : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ४,००० कोटी रुपयांची ऊस बिले दिलेली नाहीत, असे राज्य ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे (एसएसजीए) अध्यक्ष कुरबुर शांतकुमार यांनी सांगीतले. राज्य सरकारने सर्व साखर कारखान्यांना थकीत ऊस बिले देण्याबाबत त्वरात निर्देश जारी करण्याची गरज आहे, असे शांतकुमार म्हणाले.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शांतकुमार म्हणाले की, शेतकऱ्यांनी अनेक अडचणी असतानाही चांगले पिक उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. मात्र, बाजारातील उतार-चढाव आणि बिले मिळण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे ते असाहाय्य बनले आहेत. ते म्हणाले की, सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांची जर उपेक्षा केली, तर शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि राज्यव्यापी आंदोलनाची सुरूवात केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here