नेपाळ: साखर कारखान्यांकडे शेतकर्‍यांचे करोडो रुपये थकीत

काठमांडू: भारताप्रमाणे नेपाळमध्येही ऊस थकबाकीचा मुद्दा सध्या तापला आहे. साखर कारखान्यांकडून आतापर्यंत शेतकर्‍यांचे 500 दशलक्ष रुपयांपेक्षा अधिक देय बाकी आहे. ऊस शेतकर्‍यांच्या अनुसार, साखर कारखाने बराच काळ बंद असल्याचे सांगून कारखाने उर्वरीत देय भागवण्यास नकार देत आहेत. ऊस शेतकरी एक्शन कमिटी चे सचिव हरी श्याम राय यांनी सांगितले की, सरकारने अनलॉक केल्यानंतर ऊस उत्पादकांना त्यांची सर्व थकबाकी देण्याचे अश्‍वासन दिले आहे. राय म्हणाले की, जर आश्‍वासन पूर्ण केले गेले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु. यापूर्वी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी काठमांडू मध्ये मैथिगर क्षेत्रामध्ये निदर्शने केली होती.

शेतकर्‍यांनी सांगितले की, यापूर्वी, साखर कारखान्यांनी आपला स्टॉक विकल्यानंतर शेतकर्‍यांना पूर्ण पैसे देण्याचे अश्‍वासन दिले होते. साखर उत्पादक संघानुसार, गेल्या हंगामात घरगुती साखर कारखान्यांनी जवळपास 180,000 टन साखरेचे उत्पादन केले आणि त्यांनी आपले जवळपास सर्व उत्पादन विकले. देशभरामध्ये एक डझन साखर कारखाने सुरु आहेत. काही अपवाद सोडल्यास, त्यापैकी बहुतेक जवळपास प्रत्येक वर्षी शेतकर्‍यांना त्यांचे पैसे देण्यात विलंब करतात.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here