उत्तर प्रदेश :भाजप प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह व शेतकरी मोर्चा प्रदेश अध्यक्ष राजा वर्मा यांनी पश्चिमी यूपी च्या शेतकर्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये यूपी तील 8 जिल्ह्यातील ऊस शेतकरी सहभागी झाले होते. प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी शेतकर्यांकडून तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली. शेतकर्यांनी योगी आदित्यनाथ सरकारने ऊस थकबाकीबाबत केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. भाजप प्रदेश अध्यक्ष यांनी शेतकर्यांच्या इतर समस्यांना प्राधान्य देवून त्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे अश्वासन दिले. भाजप प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितले की, देश कोरोनाशी लढत आहे. अन्नदाता असणार्या शेतकर्यांच्या जिवावर या वैश्विक महामारीशी देश लढत आहे. शेतकर्यांनी या महामारीमध्ये देंशासाठी चांगले योगदान दिले आहे. तसेच पूर्ण इमानदारीने आपली जबाबदारी निभावली आहे. त्यांनी सांगितले की, लवकरच एक बैठक़ घेवून शेतकर्यांशी संबंधीत सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करु.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.