साखर कारखाना परिसरात शेतकर्‍यांचे धरणे आंदोंलन

 

नानौता (सहारनपूर): भारतीय किसान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षाचे आणि चालू हंगामाचे थकीत देंय देण्याबाबत मागणी करुन शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातमध्ये धरणे आंदोलन केले. विज समस्यांबाबतही शेतकर्‍यांनी अधिक़ार्‍यांना आपल्या मध्ये बोलावून समस्या मांडल्या.

मंगळवारी भारतीय किसान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजब सिंह व साखर कारखान्याचे माजी चेअरमन चौधरी कंवर सिंह यांच्या नेतृत्वामध्ये शेतकर्‍यांनी किसान सहकारी साखर कारखान्यात पोचून धरणे आंदोलन केले. किसान संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून गेल्या वर्षीचे आणि चालू हंगामाचे शेतकर्‍यांचे थकीत देय दिलेले नाही. शेतकर्‍यांना हे देय व्याजासहित द्यावे. या मागणीबाबत साखर कारखान्याचे मुख्य अभियंता संदीप गुप्ता आणि सीसीओ आरसी शर्मा यांना बोलवण्यात आले. कारखाना अधिक़ार्‍यांनी सागितले की, कारखान्याकडून उस थकबाकी भागवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत, लवकरच फेडरेशन अधिक़ार्‍यांशी चर्चा करुन शेतकर्‍यांचे पैसे भागवतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here