थकीत ऊस बिले देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने

कुशीनगर : कप्तानगंज विभागातील बभनौली गावात रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिले देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्यांनी कप्तानगंज साखर कारखाना प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. जर एका आठवड्यात ऊस बिले देण्यास सुरुवात झाली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. उपजिल्हाधिकारी रत्निका श्रीवास्तव यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकरी शांत झाले.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी सुभाष यादव, महेश सिंह, रमेश सिंह, पवन यादव, सुरेश सिंह, सुधीर, श्रीराम, दयाशंकर, बृजभान सिंह, रामेश्वर यादव, सौरभ साहनी, मंकेश्वर गोंड़, लाल प्रजापती, मथुरा सिंह, रामप्रसाद, सुरेश चौहान आदींनी सांगितले की, विभागातील पिपरा, पचार, बौलिया, खभराभार, राजमंदिर, गजरा, कोटवा, सेमरा, कारीतीन, सुम्हाखोर, बोदरवार, सुधियानी, बडहरा बाबू, बभनौली यांसह इतर गावांतून कप्तानगंज साखर कारखान्याला उसाचा पुरवठा केला जातो. साखर कारखान्याने ऊसाचे पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण, औषधोपचार व घरखर्च चालवणे मुश्किल झाले आहे. बिले थकीत असल्याने वीज विभागानेही कनेक्शन तोडले आहे. शासन आणि प्रशासनाकडून कारखान्यावर पैसे त्वरीत देण्यासाठी दबाव टाकला जात नाही. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कोणत्याही परिस्थितीत थकबाकी देण्याबाबत आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here