शेतकऱ्यांनी शेतात राहून करावा ऊस सर्वे: डीसीओ

धामपूर : जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सोमवारी ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बल्लारशेरपूर गावात जाऊन ऊस सर्वे कार्याचे निरीक्षण केले. दरम्यान डीसीओ यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, त्यांनी आपापल्या शेतातील ऊस सर्वे दरम्यान स्वतः उपस्थित राहावे. सर्वे मध्ये कोणत्याही प्रकारची गडबड होउ नये. काही गडबड झाली तर गाळप हंगामा च्या दरम्यान त्यांना मोठ्या अडचणी येऊ शकतात. अशा वेळी काही त्रुटी राहिल्यास त्यांना दूर करणे शक्य होणार नाही. डीसीओ यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी सर्वे कार्य पूर्ण झाल्यानंतर घोषणा पत्र स्वतः उपलब्ध करून सर्वे करणाऱ्या पथकांना द्यावे. ज्यामध्ये लिहिले जावे की, आमचा ऊस सर्वे चांगल्या पद्धतीने झाला आहे. यावेळी एससीडीआय अमित कुमार पांडये, सचिव मनोज कुमार कोंट, ऊस व्यवस्थापक ओपी वर्मा उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here