चरथावल : ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक विनो कुमार तथा एसपी सिंह यांनी देवबंद साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांसमवेत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्व्हेची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी ऊसाबरोबरच पूरक पिके घेऊन नफा कमवावा असे आवाहन अधिकाऱ्यांनी यावेळी केले. यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, देवबंद साखर कारखान्याशी संबंधित शेतकऱ्यांची बैठक शेतकरी संदीप त्यागी यांच्या घरी झाली. एससीडीआय विनोद कुमार यांनी सांगितले की, पहिल्यांदाच ऊस आयुक्तांच्या निर्देशानुसार ६३ कॉलममध्ये शेतीचे विवरण जोडण्यात आले आहे. त्याचे महत्त्व विनोद कुमार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. सचिव शशि प्रकाश सिंह यांनी पिकांवर नॅनो युरियाची फवारणी करावी आणि ऊस रोगमुक्त कसा करावा याच्या टिप्स दिल्या. कारखान्याचे सहाय्यक सरव्यवस्थापक विपिन त्यागी यांनी नव्या प्रजातीच्या ऊस लागवडीची माहिती दिली. विभागीय प्रमुख जगजीत सिंह, योगेंद्र डबास, पर्यवेक्षक, शेतकरी मेळावा समितीचे सदस्यांना शेअर प्रमाणपत्र देण्यात आले. सुनील दत्त त्यागी, डॉ. भारत भूषण, उमेश त्यागी, कमलकांत त्यागी, प्रवीण त्यागी, राम नारायण, पप्पू, देवेंद्र त्यागी, रविकांत त्यागी, सिंपल आदी उपस्थित होते.