ऊस थकबाकी मिळाल्याने शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार

लखनऊ: पश्चिमी उत्तर प्रदेश च्या ऊस शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ऊस थकबाकी भागवणे आणि गुन्हेगारांपासून क्षेत्राला मुक्त करण्यासाठी आभार मानले. योगी आदित्यनाथ यांच्याशी सरकारी आवासाच्या प्रश्नावर चर्चा करताना शेतकरी म्हणाले, राज्य सरकार ने ऊसाच्या वजन काट्यातील विसंगती वर लक्ष देवून त्यांना उत्पन्नातील नुकसानापासून ही वाचवले आहे. त्यांनी राज्य सरकार कडून ऊस अॅप लॉन्च करण्याचेही कौतुक केले.

मुजफ्फरनगर चे शेतकरी अरविंद मलिक म्हणाले, अपराध करणाऱ्यांविरोधात योगी शासनाने कड्क भूमिका घेतली. या देशाला आपली गरज आहे. ते म्हणाले, पहिल्यांदा, साखर कारखान्यांनी ऊस खरेदीचा विक्रम केला आहे. उस अॅप च्या माध्यमातून पूर्ण पारदर्शकतेने शेतकऱ्यांना पेपरलेस पावत्या उपलब्ध झाल्या आहेत.

मुख्यमंत्री योगींचे आभार मानताना मेरठ चे शेतकरी म्हणाले, लॉकडाउन दरम्यान ज्यावेळी सर्व औद्योगिक प्लांट बंद होते, तेव्हाही राज्यात साखर कारखाने सुरू होते. त्या शिवाय ऊस विभागाने लॉकडाउन दरम्यान ऊस शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे.

लखीमपुर खीरी चे शेतकरी म्हणाले की, सरकार ने त्यांच्या दरवाज्या वर ऊसाच्या पावत्यांची डिलीवरी केली आहे आणि ऊस ही वेळेवर कारखान्यांपर्यंत पोचला आहे. अंबेडकरनगर, पीलीभीत, गोरखपुर, गोंडा, कुशीनगर च्या ऊस शेतकऱ्यांनीही ई – पावती प्रणालीचे कौतुक केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here