ऊस आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

अंबाला : गेल्या हंगामातील सुमारे ६६ कोटी रुपयांच्या ऊस बिलांच्या थकबाकीबाबत संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पंचायतचे आयोजन केले होते. सरकारने ४ ऑक्टोबरपर्यंत ऊस उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक बोलावली नाही तर पाच ऑक्टोबरपासून शेतकरी आंदोलन सुरू करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

Tribuneindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी पंचकुलामध्ये ऊस आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा आणि पाच ऑक्टोबरपासून तेथे बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी २८ सप्टेंबर रोजी ऊस आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याची घोषणा केली होती. नाायणगड साखर कारखान्यासमोर शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र झाले. कारखाना गळीत हंगाम सुरू शकणार नाही अशी शंका शेतकऱ्यांना होती. त्यामुळे त्यांची ऊस थकबाकी अडकण्याची शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here