बंद साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

केशवरायपाटन: बंद साखर कारखाना सुरु करण्यासाठी शेतकरी आणि युवक सोमवारी क्षेत्रातील पंचायतींमध्ये प्रशासनाच्या कामावर बहिष्कार टाकून पंचायत मुख्यालयांवर धरणे आंदोलनाबरोबरच असहकार आंदोलनही पुकारणार आहेत. संयुक्त किसान समन्वय समिती कडून सुरु असलेल्या साखर कारखाना संचालनाला घेवून आंदोलनाला गती देण्यासाठी शेतकरी संघटनांची रविवारी बैठक़ झाली. यामध्ये हाडौती शेतकरी यूनियन चे विभागीय महामंत्री दशरथ शर्मा म्हणाले, बंद पडलेला हाडौती क्षेत्रातील जीवनदायिनी असणार्‍या साखर कारखान्याबाबत दोन्ही प्रमुख दलांनी मोठे राजकारण केले, पण शेतकर्‍यांचे भले करु शकले नाहीत.

ऊसाचे उत्पादन ठप्प होण्याबरोबरच शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सातत्याने घसरत आहे. सोयाबीन आणि तांदूळाचे पीक शेतकर्‍यांसाठी घाट्याचा सौदा आहे. अशामध्ये ऊस उत्पादन सुरु झाले तर ते क्षेत्राच्या नव्वद टक्क्यापेक्षा अधिक बँक कर्जामध्ये असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायद्याचे ठरेल.

या बैठक़ीत शेतकरी नेते रामगोपाल मीणा, भंवरलाल चौधऱी, सूरजमल नागर, बद्रीलाल बैरागी, अरविंद भूतिया, रामकल्याण सैनी, जगदीश वर्मा उपस्थित होते. समिती प्रतिनिधी गिर्राज गौतम, नवीन शृंगी यांनी सांगितले की, सोमवारी जिल्ह्यातील अनेक पंचायतींमध्ये प्रदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले जाईल. यानंतरही सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ओंदोलन तिव्र केले जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here