शेतकर्‍यांना मोबाइलवरच मिळणार ऊस पावती

मोदीनगर: यावेळी ऊस विभागाकडून पावती वितरकांची नियुक्ती करण्यात येणार नाही. ऊस शेतकर्‍यांना आता त्यांच्या मोबाईलवरच मॅसेज च्या माध्यमातून पावत्यांचे वितरण केले जाईल.यासाठी विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आता गावांमध्ये जावून शेतकर्‍यांना याबाबत माहिती दिली जात आहे. सर्वाना आपल्या मोबाइलचा इनबॉक्स रिकामा ठेवण्यास सांगितले जात आहे.

याबाबत तिबडा रोड स्थित सहकारी ऊस विकास समितीचे सचीव अजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, यावेळी सट्टा प्रदर्शनाचे काम सुरु आहे. अशामध्ये शेतकर्‍यांनी येथे येवून आपल्या फोन नंबरची तपासणी करावी. हे आवश्यक आहे कारण, मोबाइल नंबरवर ऊस पावती पाठवण्यात येणार आहे. जर नंबरमध्ये चूक असेल, तर ताबडतोब ती चूक दुरुस्त करावी.

त्यांनी सांगितले की, या दरम्यान शेतकर्‍यांना मोबाईलच्या फिचर संदर्भात माहिती दिली जात आहे. त्यांना सांगितले जात आहे की, फोनचा इनबॉक्स रिकामा ठेवावा. कधी कधी इनबॉक्स फुल झाल्याने नवे मॅसेज येत नाहीत. अशामध्ये शेतकर्‍यांना समितीच्या चकरा माराव्या लागत आहेत. शेतकर्‍यांची समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केला जात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here