थकीत ऊसबिलाबाबत शेतकरी देणार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भारतीय किसान युनियन जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांची सुल्लतानपूर गावात मासिक बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांना लवकर ऊस बिले न मिळाल्या आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

याबाबत प्रदेश महासचिव यतेंद्र शर्मा म्हणाले, जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे भाकियू जनशक्तीच्यावतीने यााबबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. जर वेळेत ऊस बिले मिळाली नाहीत, तर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल.

यावेळी मनीष शर्मा, राहुल त्यागी, प्रदीप शर्मा, मोहम्मद युसुफ, मुनेन्द्र चौधरी, मनोज कुमार, कृष्णपाल, मोहित कुमार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here